आज जर समर्थ असते, तर आजचा उच्चभ्रू मध्यमवर्ग पाहून ‘सांगे वडिलांची कीर्ती’ यापुढे ‘तो एक ढोंगी’ असं म्हणाले असते की, ‘तो एक दांभिक’, की ‘तो एक कोडगा’, की…

बहुतांश उच्चभूंना आपल्याच गावात आपल्याच पूर्वजांनी गेल्या हजारो वर्षांपासून आजतागायत अस्पृश्यांवर, कनिष्ठ जातींवर, विधवांवर केलेल्या अत्याचारांची खंत सोडा, माहितीही नसते. पण एक हजार वर्षांपूर्वी मुहम्मद गझनवीने आणि आठशे वर्षांपूर्वीच्या मुहम्मद घोरीने केलेल्या अत्याचारांची मात्र इत्थंभूत माहिती असते. अर्थात व्हॉट्सअ‍ॅपवर दुसऱ्या कोणीतरी उच्चभ्रूने ‘फॉरवर्ड’ केलेल्या ‘फेक न्यूज’वर आधारित असते.......